ठळक बातम्या

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच वणी च्या वतीने नामांतर दिन उत्साहात संपन्न.


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच वणी च्या वतीने नामांतर दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मंचाचे वतीने बंडू कांबळे, संजय तेलंग, घनश्याम ठमके, प्रा.पुरूषोत्तम पाटील , रामदास कांबळे,गोवर्धन तेलतुंबडे आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा.पुरूषोत्तम पाटील यांनी सांगितले की २७ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमुखाने मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता.परंतु या ठरावाची अंमलबजावणी होण्यासाठी १४ जानेवारी १९९२ पर्यंत वाट पाहावी लागली.१४ वर्षाचा प्रदिर्घ काळ लोटला त्यासाठी अनेकांना बलीदान करावे लागले .पोचीराम कांबळे,प्रतीभा तायडे जनार्दन मवाडे, सुहासिनी बनसोडे, गौतम वाघमारे.दिलीप रामटेके,चंदर कांबळे असे किती नांवे सांगावित  ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलीदान केले.अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली.देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाने १५ विद्यापीठ आहेत.परंतु त्यांच्याच कर्मभूमीत त्यांच्या नावासाठी किती विरोध झाला ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे असेही प्रा.पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

    या कार्यक्रमाला मंचाचे अध्यक्ष बंडू जी कांबळे, उपाध्यक्ष द्वय संजय तेलंग,घनश्याम ठमके, कोषाध्यक्ष रामदास कांबळे,प्रा.पुरुषोत्तम पाटील, गोवर्धन तेलतुंबडे,दिगांबर पुणवटकर.मनोहर ठमके,कवडू जीवने, पुंडलिक पथाडे, पुंजाराम भादीकर, वसंत नगराळे, दादासाहेब घडले, देवानंद झाडे, उल्हास पेटकर आदी उपस्थित होते.


    .

    Photo